सकाळी उशीर झाला म्हणून रागात आई ने फॅन बंद केला कि चीड चीड करत उठायचं.. उठताच फ्रिज उघडून रात्री बनवलेलं ice - cream पाहून गोड हसायचं .. आईला कामात मदत म्हणून शेवटच्या दोन पोळ्या मी करते असं म्हणायच.. वाळवणं करायला आईला मदत करायची,आणि ओल्या कुरडया पापड्या उलट्या करून बघून येते च्या नावाखाली गच्चीत जाऊन निम्म्या फस्त करायच्या.. आई ने मिर्ची दळायची गिरणी चालू आहे का हे पाहायला पाठवलं कि चीड चीड करायची.. सुट्टी लागण्या आधीच ठरलेल्या प्लॅन प्रमाणे मित्रमैत्रिणी सोबत डब्बा पार्टी करायची.. दिवस भर चिरपी पाणी,पत्ते,कॅरम ,आणि ३ रुपये तास भाड्याने आणलेली सायकल खेळणे ह्यात पूर्ण वेळ घालवणे .. विक्रम वेताळा,चंपक ची पुस्तके वाचायची ,आणि t.v वर सोन परी आणि शकालाला बुमबुम पाहायचे..ह्या सुट्टीत रामरक्षा,गणपती अथर्वशिश ,२१ चे पाढे पाठ झालेच पाहिजे ह्या आई च्या कडक सक्ती वर कुर कुर करायचे .....सुती पांढय्रा कपड्यावर आंब्याचे पिवळे डाग लागला कि आई रागवून नये म्हणून पाणी लावून पूर्ण ड्रेस ओला करायचा... दुपारी कुल्फी ची गाडी आली कि "ओ मामा थांबा ,मला दोन" म्हणत त्याच्या मागे पाळायचं.... ४ वाजता भूक लागली कि तिखट मीठ लावलेले मुरमुरे,सातूचे पीठ,कलिंगडाच्या फोडी खायचं.. बाहेर भांडण करून आल्यावर आईचे बोलणे खायचे ,"थोडा अभ्यास करा पुढच्या वर्गाचा,आता सोपं नसतो अभ्यास "... संध्याकाळी बाबा आले कि उसाचा रस प्याला जाऊना म्हणून हट्ट करायचा ,आणि सगळे मिळून रस प्याला जायचं .. , रात्री येणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा वास घेत ,एक दोन फुले आई पासून चोरून तोडायची.. .. मग आत्ते मामे मावस भाऊ बहिणींबरोबर एकमेकांकडे राहायला जाण्याचा plan... नातेवाईकांना कडे गेल्यावर केलेली मज्जा आणि येताना त्यांनी घेतलेला छान ड्रेस ह्यामुळे तर आनंदाला पारावर उरात नसे ... पण ह्या सगळ्या नंतर कळी गोमजण्याच कारण म्हणजे जवळ येणार result....
रम्य ह्या बालपणात कधीच निराशा नव्हती ,तणाव नव्हता....
फक्त आनंद घेणे आणि देणे एवढंच होत ...
सुंदर ते बालपण... आणि सुंदर ती उन्हाळ्यची सुट्टी.. ...
रम्य ह्या बालपणात कधीच निराशा नव्हती ,तणाव नव्हता....
फक्त आनंद घेणे आणि देणे एवढंच होत ...
सुंदर ते बालपण... आणि सुंदर ती उन्हाळ्यची सुट्टी.. ...